केडीएमसीचा दक्षता गुणवत्ता नियंत्रण विभाग वादाच्या भोवर्यात
गुणवत्ता चाचणी अवहाल दिला जातो कागदावरच
टेस्टिंग मँटेरियल डिसपोजल रजिस्टर मध्ये नोंद नसल्याचा माजी नगरसेवक मोहन उगले यांचा आरोप
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा दक्षता गुणवत्ता नियंत्रण विभाग वादाच्या भोवर्यात सापडला असून गुणवत्ता चाचणी अहवाल कागदावरच दिला जात असून टेस्टिंग मँटेरियल डिसपोजल रजिस्टर मध्ये नोंद नसल्याचा आरोप माजी नगरसेवक तथा शिवसेना उपशहर प्रमुख मोहन उगले यांनी केला आहे. कल्याण डोंबिवली मनपाच्या दक्षता गुणवत्ता नियंत्रण विभागाकडे सन 2020ते 2025 या कालावधीतील टेस्ट रिपोर्ट संदर्भात माहिती मोहन उगले यांनी मागविली होती. माहिती दिली नसल्तयाचे तसेच टेस्ट रिपोर्ट कागदावरच ठेकेदारांना दिले असल्याचा आरोप प्रसिद्धी माध्यामां समोर उगले यांनी केला आहे.
सर्व लोकांचा कायास होता की, मनपाच्या गुणवत्ता दक्षता नियंत्रण विभागात कुठल्याही प्रकरच्या टेस्ट होत नाही. पंरतु या विभागातील संजय सोमवंशी नामे इसम होता. तो सर्व ठेकेदाराकडून पैसे घेऊन कागदावरच टेस्ट रिपोर्ट देत होता, प्रत्यक्षात मनपाकडून कुठल्याही प्रकराची टेस्ट होत नाही. याबाबत उगले यांनी माहिती अधिकारात त्यांना विचारले होते, की कुठल्या प्रकरच्या टेस्ट होतात, त्या टेस्टचे रिपोर्ट द्यावेत. सिमेंट, खड्डी, रेती, गुणवार माहिती द्यावी. अशा प्रकरची माहिती उपलब्ध नाही, तसेच रजिस्टर मध्ये कुठल्याही प्रकरची नोंद नव्हती आणि जे टेस्ट रिपोर्ट घेण्यासाठी लँब् मध्ये मटेरियल जमा करतात, त्या़चे डिस्पोज्बल रजिस्टर मध्ये नोंद नाही. म्हणजे जे रिपोर्ट दिलेले आहेत ते कागदावरच आहेत.
ठेकेदारांना फक्त कागदावरच रिपोर्ट दिला जातो. केडीएमसीच्या कामाची गुणवत्ता काय राहणार? हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. आठ दिवसापूर्वी डांबर टाकले ते निघून गेले आणि अशा प्रकारचे टेस्ट रिपोर्ट मिळत असतील, तर करदात्यां नागरिकांनी कोणाकडे बघायचे, आयुक्तांनी या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे अशी मागणी उगले यांनी केली आहे. तर ज्यांनी ज्यांनी मनपाच्या गुणवत्ता कामाचा खेळ खंडोबा केला आहे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असे सांगितल्याने मनपाचा गुणवत्ता दक्षता नियंत्रण विभाग वादाच्या भोवर्यात सापडला आहे. तर याबाबत उगले यांनी शहर अभियंता अनिता परदेशी यांना देखील पत्र देत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.