कल्याण : दुर्गाडी किल्ला परिसरातील भिंतीचा काही भाग कोसळला, कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
कल्याण, पश्चिम – ऐतिहासिक वारसा असलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या डागडुजीचे काम सध्या सुरू असून, कोट्यवधी रुपयांच्या निधीतून हे काम राबवले जात आहे. मात्र, पहिल्याच पावसात किल्ल्याच्या भिंतीचा काही भाग कोसळल्याने, या कामाच्या गुणवत्तेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये यामुळे नाराजीचा सूर दिसून येत आहे. एवढ्या मोठ्या निधीतून सुरू असलेल्या कामात जर पहिल्याच पावसात अशी दुर्घटना घडत असेल, तर येथील कामाच्या दर्जावर आणि देखरेखीच्या अभावावर गंभीर शंका उपस्थित होत आहेत.
इतिहासप्रेमी आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून संबंधित यंत्रणांकडे सखोल चौकशी करून दोषी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
ब्युरो रिपोर्ट – CEN NEWS, कल्याण