घनकचरा शुल्कवाढ करुन केडीएमसीने नागरीकांना पाठविलेल्या बिलांची
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केली होळी
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विरोधात सर्व पक्षीय लोकांनी मोर्चे काढले. या घनकचरा शुल्क वाढीचा विरोध केला. गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला कुठलीही जाग आलेली दिसत नाही. महापालिका प्रशासनाने वाढिव कराची बिले नागरीकांना पाठविलेली आहेत. आठ हजार रुपये लोकांचा कर वाढला आहे. कराची बिले जाळून कल्याण डोंबिवली महापालिकेचा निषेध केलेला आहे. याच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याची आमची भूमिका आहे असे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांनी सांगितले.
सत्ताधारी पक्षाच्या लोकांना बोलालयाचाल कुठे जागा उरलेली नाही. त्यांनी मौन धारण केले आहे. माझे म्हणणे आहे त्यांनी या करवाढीच्या विराेधात एक तरी व्यक्तव्य करावे. लोकांच्या बाजूने उभे राहवे. पुढच्या महापालिकेच्या निवडणूकीत लोक माफ करणार नाही. त्यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही अशी टिकाही म्हात्रे यांनी सत्ताधारी पक्षावर केली आहे.
बाईट- दीपेश म्हात्रे, जिल्हा प्रमुख शिवसेना ठाकरे गट