डोंबिवलीत सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीची जाहीर सभा: 27 गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका करण्याची जोरदार मागणी
डोंबिवलीत आज सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या वतीने भव्य जाहीर सभा पार पडली. या सभेला आगरी समाजासह विविध पक्षांचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचं प्रमुख आकर्षण म्हणजे समितीचे अध्यक्ष आणि भिवंडीचे खासदार सुरेश उर्फ बाळूमामा म्हात्रे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व माजी आमदार राजू दादा पाटील यांची उपस्थिती.
बाईट – सुरेश उर्फ बाळूमामा म्हात्रे (भिवंडी खासदार, अध्यक्ष – संघर्ष समिती):
“27 गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका करण्याची ही मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. जर समाज एकत्र आला, तर आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू.”
बाईट – राजू दादा पाटील (माजी आमदार, मनसे नेते):
“27 गावांपैकी नऊ गावे सध्या महानगरपालिकेत आहेत, तर उर्वरित अठरा गावांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. हा निर्णय लवकर लागावा आणि या गावांना योग्य न्याय मिळावा, यासाठी आम्ही आवाज उठवत राहू.”
सभेत अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये बुद्ध बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष संतोष केने, शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, वारकरी संप्रदायाचे नेते, आणि आगरी समाजाचे अनेक प्रतिष्ठित नेते यांचा समावेश होता.
संघर्ष समितीची प्रमुख मागणी:
27 गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करावी यासाठी लढा देण्यात येणार आहे. लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर अधिकृत निवेदन सादर केले जाणार आहे. भविष्यात मंत्रालयावर मोठा मोर्चा काढण्यात येईल, अशी घोषणा देखील अध्यक्षांनी केली.
ही सभा केवळ मागणीसाठी नव्हती, तर आगरी समाजाच्या एकतेचं आणि संघर्षशक्तीचं प्रतीक बनली.