ब्रेकिंग न्यूज : कल्याण रिंग रूटवर पुन्हा भीषण अपघात, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त
कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी रिंग रूट प्रकल्पावर आज पुन्हा एकदा भीषण अपघात घडला. या अपघातात एक अवजड वाहनाने अनेक गाड्यांना जोरदार धडक दिली आणि स्वतःही रस्त्यावर पलटी झाले.
अपघातामुळे चार ते पाच चारचाकी वाहनांचे आणि तीन दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.
रिंग रूट अजून सुरू नाही, पण अपघात मात्र सुरूच!
हा रिंग रूट मार्ग अद्याप अधिकृतपणे सुरू झालेला नाही. तरीही याच मार्गावर वारंवार अपघात घडत असून, प्रशासनाला सुरक्षा वाढवण्यासाठी अनेक वेळा निवेदन देण्यात आले आहेत. मात्र, प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
अपघातग्रस्त वाहनचालकांची व्यथा:
“मी फक्त ऑफिसला जात होतो, अचानक एक मोठा ट्रक वेगात आला आणि आमच्या गाडीला जोरात धडक दिली. माझी गाडी अक्षरशः चिरडली गेली. सुदैवाने मी वाचलो, पण एवढ्या महागड्या गाडीचं जे नुकसान झालं त्याचं काय?”
– अपघातग्रस्त चारचाकी गाडीचे मालक
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी आहे की, प्रशासनाने रिंग रूट पूर्ण सुरू होईपर्यंत त्यावर वाहनांची वर्दळ थांबवावी आणि योग्य सुरक्षा उपाय त्वरित लागू करावेत.
ब्युरो रिपोर्ट – CEN NEWS, कल्याण