छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरित्र प्रेरणादायी असून कितीही संकटे आली तरी हार मानायची नाही असा बोध त्यांच्या चरित्रातून मिळतो, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी नवी दिल्ली येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या 368 व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
महाराष्ट्र सदन येथे सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन, छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय जयंती व सांस्कृतिक महोत्सव दिल्ली यांच्यावतीने बुधवारी छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.