“एआयच्या मदतीने महाराष्ट्र अन्नधान्य उत्पादन आणि निर्यातीत जागतिक अग्रस्थानी पोहोचू शकतो” — देबजानी घोष
मुंबई | ५ मे:
महाराष्ट्र एआय (Artificial Intelligence) चा प्रभावी वापर करून अन्नधान्य उत्पादनात आणि निर्यातीत जगातील सर्वोत्तम राज्य बनू शकतो, असा ठाम विश्वास निती आयोगाच्या फेलो आणि नॅसकॉमच्या माजी अध्यक्षा देबजानी घोष यांनी व्यक्त केला.
#TechWari उपक्रमाच्या अंतर्गत आयोजित कार्यक्रमात बोलताना घोष यांनी सांगितले की, “शेती, पुरवठा साखळी, हवामान अंदाज, आणि निर्यातीच्या प्रक्रियेत एआयचा समावेश केल्यास महाराष्ट्राला जागतिक नेतृत्व मिळवता येईल.”
त्यांनी राज्यातील नवउद्योजक, कृषी तज्ञ आणि धोरणकर्त्यांना एआयच्या वापरासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.
#AI #TechWari #MahaTechWari